मुंबई: इंडियन टेलिव्हिजन अकादमीने (आयटीए) २५ व्या वर्धापन दिनाची जुहू येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आयटीएचा वारसा, भारतीय मनोरंजनावरील त्याचा प्रभाव आणि रोमांचक दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी मनीष पॉल, रोहित रॉय, महिमा चौधरी, शुभांगी अत्रे, किकू शारदा, ध्वानी पवार, असित कुमार मोदी, जसवीर कौर, माहिर पंधी आदी उपस्थित होते.
आयटीएचे अध्यक्ष अनु रंजन यांनी सांगितले, ‘२५ वर्षे पूर्ण होणे हा एक अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण उद्योगाच्या पाठिंब्याने अकादमीचा प्रवास समृद्ध होत आहे.’
आयटीएचे संयोजक शशी रंजन म्हणाले, ‘आयटीए नेहमीच आपल्या मनोरंजन समुदायातील प्रतिभा, नावीन्य आणि सचोटी साजरी करेल.’
‘आयटीए भारतीय टेलिव्हिजनच्या वाढीचे प्रतिबिंब आहे आणि स्टार प्लसला आपल्या उद्योगातील सर्वोत्तम व्यक्तींना सन्मानित करणाऱ्या व्यासपीठाशी सहयोग करण्यास आनंद होत आहे,’ असे जियोस्टारच्या एंटरटेनमेंटच्या (हिंदी-स्टार प्लस, स्टार भारत, स्टार उत्सव, बंगाली, मराठी आणि गुजराती चॅनेल) क्लस्टर प्रमुख सुमंता बोस म्हणाल्या.