खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबईत ‘गीता जयंती महोत्सवा’चे आयोजन !

मुंबई: जगातील महान धर्मग्रंथ श्रीमद् भगवद् गीता हा संपूर्ण मानवी जीवनाच्या प्रारब्ध आणि पुरुषार्थचा पाया आहे. कर्म, ज्ञान, दुःख, मोक्ष आणि शाश्वत आनंदाचा हा महान ग्रंथ मानवी जीवनात पुन्हा प्रस्थापित करण्याचा उच्च आदर्श घेऊन श्रीमद् भगवद् गीतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेच्या पटलावर २०२१ मध्ये मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) माध्यमातून शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत या ग्रंथाचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या दोन वर्षात श्रीमद् भगवद् गीता प्रचार समिती आणि पोयसर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद् भगवद् गीतेचा अभ्यास हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. कांदिवली येथील पोईसर जिमखाना येथे २३ डिसेंबरला गीता जयंतीनिमित्त दिव्य कृष्णलीला नृत्य, श्रीमद् भगवद् गीतेवरील व्याख्यान आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ.सितारा देवी यांच्या कन्या जयतिमाला मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृष्णलीला नृत्याचे सादरीकरण केले.यावेळी हजारो कृष्णप्रेमी नागरिकांना पुष्टीमार्गी गोस्वामी श्री १०८ राजकुमार महाराजश्री, मिरा रोड इस्कॉन मंदिराचे श्री भीमा प्रभुजी, जुहू इस्कॉन संस्थेचे श्री कृष्ण भजनदासजी यांनी श्रीमद् भगवद् गीतेवर ध्यानात्मक प्रवचनाने संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार,संपादक, प्रकाशन संस्था ज्यांनी गेल्या दोन वर्षांत श्रीमद् भगवद् गीतेच्या प्रचारात योगदान दिले आहे, त्यांना खासदार गोपाल शेट्टी आणि इस्कॉनचे स्वामी श्री कृष्ण भजन दास जी यांच्या आशीर्वादाने सन्मानित करण्यात आले.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की,’संसदेत गीता अभ्यासक्रमात जोडली पाहिजे,असा प्रश्न उपस्थित केला आणि त्याला चांगला प्रतिसाद दिला गेला. तो प्रस्ताव राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे (NCERT) पाठवला. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत सात जणांची समिती असून त्यांनी श्रीमद् भगवद् गीतेसह रामायण आणि महाभारत हेही मुलांना शिकवले जाईल, अशा प्रकारचा निर्णय घेतला. सर्व राज्यात मुलांना शाळेमध्ये श्रीमद् भगवद् गीता शिकायला मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था होणार आहे. श्रीमद् भगवद् गीता धार्मिक ग्रंथ नसून मनुष्याने मानवी जीवन कसे जगायचे, याबाबत वाचायला मिळते.म्हणून श्रीमद् भगवद् गीतेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर करून भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायला पाहिजे. तुमच्या मुलांना लहानपणापासूनच श्रीमद् भगवद् गीतेची सवय लावा. त्याला तुमच्या जीवनाचा भाग बनवा.आजच्या युगात या महान शास्त्राचा आधार घेऊन जीवनातील सर्वोत्तम कर्म करायचे आहेत.’

गीता जयंती महोत्सवाला पुष्टिमार्ग गोस्वामी श्री राजकुमार महाराजश्री, मीरा रोड इस्कॉन मंदिराचे श्री भीमा प्रभुजी, जुहू इस्कॉन संस्थेचे श्री कृष्ण भजनदास जी, दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी,पोईसर जिमखाना अध्यक्ष मोहन भंडारी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, गीता जयंती उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते डॉ.योगेश दुबे, भाजपचे ज्येष्ठ नेते एड.जे.पी.मिश्रा, उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, भाजप मुंबई सचिव विनोद शेलार, आचार्य पवन त्रिपाठ, अ‍ॅड.ज्ञानमूर्ती शर्मा, श्रीकांत पांडे, गंगाराम जमनानी, योगेश वर्मा, उत्तर मुंबई भाजपच्या प्रचार प्रमुख नीलाबेन सोनी, सर्व माजी नगरसेवकांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कृष्णप्रेमी नागरिक उपस्थित होते.