पत्रकार राजेंद्र घरत यांचा राष्ट्रीय लोकगौरव पुरस्कार देऊन सन्मान !

मुंबई:लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि टी.एम.जी.क्रिएशन्सच्या विद्यमाने त्यांच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार भवन येथे ४ फेब्रुवारी रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात दै. ,’आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत यांना राष्ट्रीय टी.एम.जी. शांतीदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी व औषधी वनस्पतींचे उपचारक आबा रणवरे तसेच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य सेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्तीमत्वांनाही फेटा, आकर्षक सन्मानचिन्ह, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.यावेळी विचारमंचावर माजी माहिती व जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ, ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम अभिनेते जाकिर खान, माजी पोलीस अधिकारी सुनिता नाशिककर, डॉ. जालिंदर महाडिक, अभिनेत्री अमृता उत्तरवार, रेड प्लॅनेटच्या संचालिका सिम्मी शेख, आयकॉन फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन बडगुजर आदि मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र घरत यांची ब्रेल लिपीमध्ये २१ पुस्तके प्रसिध्द झाली असून आणखी ४ ब्रेल पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. दै. ‘आपलं नवे शहर’मधील त्यांच्या मुशाफिरी या गेली २४ वर्षे अखंडपणे प्रसिध्द होत असलेल्या स्तंभलेखनातून व्यसनमुक्ती पर्यावरणप्रेम, विधवा-परित्यक्तांचे प्रश्न, सामाजिक विषमता, धार्मिक समस्या आदि विविध प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. आजवर त्यांनी छापील प्रसिध्दीमाध्यमांकरिता सुमारे बाराशेहुन अधिक तर इलेवट्रॉनिक माध्यमांकरिता २४० च्या आसपास मुलाखती घेऊन विविध गुणी व्यवितमत्वांचे काम समाजासमोर आणले आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे संस्थापक एन. डी. खान व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रदीर्घ मेहनत घेतली.